माहूर तालुक्यातील सिंदखेड फीडर अंतर्गत येणाऱ्या करंजी, सेलू,लोकरवाडी, सिंदखेड, सारखणी, वायफानी, भगवती , दहेली , दहेलीतांडा , दुंद्रा, आदी गावातील शेतकऱ्यांचे उभे पीक वाळून चाललेत, महावितरण चे अधिकारी झोपेत आहेत. एकही लाइनमेन काम करण्यास तयार नाही. कायमस्वरूपी फॉल्ट निघत नाही. त्यांच्या हाताखाली ठेवलेले माणसे थातूरमातुर कामासाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे. शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून उभ्या पिकांसाठी खांब्यावर चढव लागत आहे. त्यांच्या जीवित्वाची जबाबदारी महावितरण घेणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वायफनी पुनर्वसित गावठाण अन्तर्गत झालेल्या महावितरण च्या बोगस कामांची चौकशी व्हावी अशी मागणी-अरविंद पाटील यांनी केली आहे,तर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याची चेतावणी वायफाय येथील - त्रिशूल पाटील यांनी दिली आहे.


👌👌🙏🏽 thanks MarathwadaNews
जवाब देंहटाएंRashid Fazlani 💐
Welcome
जवाब देंहटाएं