अभिवक्ता संघाकडून राहुरी घटनेचा निषेध
प्रतिनिधी रशीद फाजलानी
किनवट,दि.२९: अहमदनगर जिल्हात राहुरी तालुक्यातील न्यायालयात काम करणारे अँड. राजाराम आढाव व अँड मनिषा आढाव यांचा दि. २५ जानेवारी रोजी खंडणीसाठी अपहरण करुन निर्घृण खुन करण्यात आला अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध म्हणून आज (दि.२९) न्यायालयीन कामकाजात वकिलांनी सहभाग नोंदविला नाही.
यासंदर्भाने एक निवेदनही दिवाणी न्यायाधिश यांना देण्यात आले.निवेदनात नमुद केले आहे की, अहमदनगर जिल्हात राहुरी तालुक्यातील न्यायालयात काम करणारे अँड. राजाराम जयवंतराव आढाव व अँड. मनिषा राजाराम आढाव या दाम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन निर्घृण खुन करण्यात आला आहे. अशा अमानवी कृत्याचा व प्रवृत्तीचा जाहीर निषेध म्हणून आज रोजीच्या न्यायालयीन कामकाजात सहभाग न देता सर्व वकील सदस्यंहे अर्ज देऊन प्रकरण वाढवून घेत आहोत.निवेदनावर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड. आर. डी. सोनकांबळे, उपाध्यक्ष अँड. श्रीकृष्णा मो. राठोडसचिव अँड. एस. पी. शिरपुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें