ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 22 अगस्त 2019

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या:- विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचा आरोप



माहूर:- सर्वाधिक आत्महत्या शिवशाहीच्या देवेंद्र फडवणीस व उद्धव ठाकरे यांच्या युती शासनाच्या काळात झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना  अभिप्रेत नाही. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी आपल्या सैन्याला सांगितले होते शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही जरी धक्का लागला तर मी तुमची हात करेल यावर हे सरकार शेतकऱ्यांची जात नष्ट करायला निघाली आहे त्यामुळे ही सरकार शिवशाहीचे सरकार असू शकत नाही.असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माहूरगडावरील पत्रकार परिषदेत केला.


पुढे बोलताना विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले की, या सरकारकडून अतिशय गलीच्छ व हिन पद्धतीने राजकीय भ्रष्टाचार करून राजकारण केल्या जात आहे, हे पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही असे ते म्हणाले.छत्रपती उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना भाजपा पक्ष प्रवेश  संदर्भात विचारणा केली असता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सांगली कोल्हापूर मिरज येथे महापुराने थैमान माजवील्या ने तेथील परिस्थितीवर स्थानिक नेते लक्ष देऊन आहेत.तर नाशिक च्या येवल्यामध्ये या विपरीत परिस्थिती असून त्या ठिकाणी पाण्याची अतिशय टंचाई निर्माण झाल्याने तेथील नागरिकावर उद्भवलेल्या परिस्थितीचा निराकरण करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब मतदार संघात आहेत. तर उदयन राजेयांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते यात्रेत समाविष्ठ होऊ शकले नाही. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.महाजनादेश व जन आशीर्वाद यात्रेचा समाचार घेत राज्यात सत्तापरिवर्तन अटळ असून काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या आघाडी सत्ता स्थापन होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.धनंजय मुंडे म्हणाले की, सांगली कोल्हापूर मिरज येथील महापुराने थैमान माजल्या ने तेथील परिस्थितीवर स्थानिक नेते लक्ष देऊन आहेत.तर नाशिक च्या येवल्यामध्ये या विपरीत परिस्थिती असून त्या ठिकाणी पाण्याची अतिशय टंचाई निर्माण झाल्याने तेथील नागरिकावर उद्भवलेल्या परिस्थितीचा निराकरण करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब मतदार संघात आहेत तर उदयन राजे  त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते यात्रेत समाविष्ठ होऊ शकले नाही. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. महाजनादेश व जनआशिर्वाद यात्रेचा समाचार घेत राज्यात सत्तापरिवर्तन अटळ असून काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षा च्या आघाडी ची सत्ता स्थापन होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें