हिंगोली,दि.15: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी होणार आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर यांनी लोकसभा मतदार संघनिहाय मतदान प्रक्रिया व पूर्व तयारीचा यावेळी आढावा घेतला.
यावेळी डॉ. रवीशंकर म्हणाले की, येणारे 72 तास अतिमहत्वाचे असून निवडणूक प्रक्रियेशी संबंधीत सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी. तसेच लोकसभा निवडणुका पारदर्शकपणे, निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे निर्देश दिले.
यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक योगेशकुमार, खर्च निवडणूक निरिक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, सहाय्यक निवडणूक निरिक्षक अतुल चोरमारे, प्रशांत खेडकर, प्रविण फुलारी यांच्यासह सर्व नोडल अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांची उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें